“स्वयं प्रयत्नाने दैवी मिलन शक्य आहे, आणि ते एखाद्या धार्मिक विश्वासावर किंवा वैश्विक हुकुमशहाच्या मनमानी इच्छेवर अवलंबून नाही.” योगावतार श्री श्री लाहिरी महाशयांनी प्रगल्भ शब्दांत दिलेले हे आश्वासन, वरील आदर्शासाठी समर्पित केलेल्या त्यांच्या जीवनाची जिवंत साक्ष होती. हा केवळ तात्त्विक निष्कर्ष नव्हता.
