‘प्रभाग क्रमांक एक (म्हसरूळ) मध्ये धनुष्यबाणा’ची ललकार! विरोधकांना जोरदार आव्हान; रॅलीत शिवसैनिकांचा उत्साह शिगेला!

0

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजताच पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ (म्हसरूळ) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, विरोधकांच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. जनसामान्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ‘बदलाच्या’ निर्धाराने प्रस्थापित उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांचीच चर्चा केंद्रस्थानी

शिवसेना (शिंदे) पक्षाने या प्रभागात नयना (करुणा) रवींद्र रामवंशी (१अ), गणेश चिंतामण चव्हाण (१ब), उर्मिला सुनिल निरगुडे (१क), प्रविण मंदाकिनी रमेश जाधव (१ड) यांसारख्या सुशिक्षित आणि स्थानिक चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. या उमेदवारांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे प्रत्येक चौकात आणि बैठकीत त्यांचीच चर्चा केंद्रस्थानी आहे.

              प्रभाग ‘धनुष्यबाणा’च्या घोषणांनी दुमदुमला

प्रभागात शुक्रवारी (दि. ९) काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. रॅलीच्या प्रारंभीच कार्यकर्त्यांनी “खिच के ताण… धनुष्यबाण” अशा गगनभेदी घोषणा देत प्रचाराचा धुराळा उडवून दिला. ही रॅली पोकार कॉलनी, विजयनगर, शिवगणगेश्वर नगर, रामेश्वरनगर, मोराडे वस्ती आणि जगन्नाथ लॉन्स परिसरातून उत्साहात मार्गस्थ झाली. या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात भगवेमय वातावरण निर्माण झाले असून मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उशाला धरण, तरीही अपरात्री पाणीपुरवठा                      गेल्या २० ते २५ वर्षांपासून एकाच चेहऱ्यांना निवडून देऊनही प्रभागाचा विकास खुंटल्याची भावना मतदारांमध्ये आहे. प्रचारादरम्यान नागरिक समस्यांचा पाढाच वाचत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, कचराकुंडीत रूपांतरित झालेली उद्याने आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे रहिवासी संतप्त आहेत. “शहराच्या उशाला धरण आणि काठावर गोदावरी असतानाही म्हसरूळकरांना रात्री-अपरात्री दोन-अडीच वाजता पाण्यासाठी जागावे लागते, हे दुर्दैव आहे,” अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

विकासाची ही नवी लाट प्रभाग १ मध्ये

“आता पुरे झाले तेच तेच चेहरे! आम्हाला बदल हवा आहे,” असा सूर प्रभागातून उमटत आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुशिक्षित असून त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे यावेळी प्रस्थापितांना घरचा रस्ता दाखवून नवीन लोकप्रतिनिधींना संधी देण्याची चर्चा आहे. विकासाची ही नवी लाट प्रभाग १ मध्ये मोठे परिवर्तन घडवेल, असा विश्वास राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.